तारबंदी योजना महाराष्ट्र 2023   Tarbandi Yojana Maharashtra

Tarbandi Yojana Maharashtra २०२३



        आज आपण या लेखामध्ये तारबंदी योजना महाराष्ट्र 202३ संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. काय आहे ही योजना, त्यासाठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार, त्या संबंधीच्या सर्व गोष्टी जसे कागदपत्रे ( Tarbandi Yojana Documents), अर्ज कसा करावा इत्यादी माहिती आज आपण पाहणार पाहणार आहोत . Tarbandi Yojana Maharashtra 2023 Online Apply


            केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांपैकी तारबंदी योजना ही अशीच एक शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे. ही योजना सरकारने तारबंदी योजना नावाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना त्यामध्ये अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या मदतीने शेतकरी इतर भटक्‍या जनावरांपासून आपल्या पिकाचे संरक्षण करू शकेल. म्हणून ही योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे.


तारबंदी योजनेसाठी अनुदान किती?

तारबंदी योजनेसाठी शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाणार असून 50 टक्के अनुदान 50 टक्के खर्च हा स्वतः शेतकर्‍याला करावा लागेल. या योजनेतून मिळणारी रक्कम ही थेट शेतकरी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल. या योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या शेतकरी अर्जदाराला त्याच्या मोबाईल द्वारे ऑनलाइन अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन या योजनेचा अर्ज भरावा लागेल आणि लाभ मिळवावा लागेल.Tarbandi Yojana Maharashtra 2023

तारबंदी योजना महाराष्ट्र योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? 

  • ज्या शेतकऱ्याकडे लागवडीसाठी 0.5 एकर जमिन आहे, त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • 400 मीटर ची तारबंद झाल्यानंतरच शेतकऱ्याला अनुदान दिले जाईल.
  • या योजनेचा लाभ देशातील सर्व अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

तारबंदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल.

  • अर्जदाराचे मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड
  • जमिनीची जमाबंदी

अर्ज कोठे करावा? Tarbandi Yojana Maharashtra 

  • तारबंदी योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर, त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र म्हणजेच सीएससी केंद्रात जावे लागेल. अर्जदार कृषी विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन देखील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
  • त्यानंतर तुम्हाला तारबंदी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्र तुमच्या एजंट ला द्यावी लागतील.
  • त्या एजंट ने विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केली जातील.
  • अर्ज भरल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल.
  • यानंतर कार्यालयात तुमचा अर्ज आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण केली जाईल.
  • अर्ज पूर्ण पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराला एसएमएसद्वारे कळवली जाईल.
  • त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.Tarbandi Yojana Maharashtra 2023 Online Apply